Posts

Showing posts from December, 2020

वर्षपूर्ती विश्वासाची आणि वचनबद्धतेची

 🚩 *वर्षपूर्ती विश्वासाची आणि वचनबद्धतेची* 🚩    जनता पहाटेच्या साखर झोपेत असताना शपथविधीचा सावळा गोंधळ घालणाऱ्या आणि वर्षभर मंत्रालयाच्या पायरीवर उभे राहून सरकार पाडण्याची दिवास्वप्न पाहणाऱ्या विरोधकांना महाविकास आघाडीच्या वर्षपूर्ती ने सणसणीत चपराक दिली आहे.     छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात परकीयांपेक्षा स्वकीयांनीच सर्वाधिक मोडते घालण्याचा प्रयत्न केला होता आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्र मध्ये शिवशाहीचे सरकार स्थापन झालेले असताना विरोधक वर्षभर तोच मोडता घालण्याचा कार्यक्रम अयशस्वीपणे राबवताना दिसत आहे.     मराठीमधील एक म्हण या विरोधी पक्षाला अगदी चपखलपणे शोभून दिसते. *कोणी निंदा कोणी वंदा आमचा सरकार पाडण्याचा धंदा* आणि पुढील काळातही त्यांना हेच काम राहणार आहे. कारण महाविकास आघाडीच्या या तीन पक्षांच्या एकत्र येण्याने स्थापन झालेले *ठाकरे सरकार* हे मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या संयमी, नीतीपूर्ण आणि संस्कारी नेतृत्वाने महाराष्ट्र राज्यावर आलेल्या अस्मानी संकटांना यशस्वीपणे लढा देत आपली वर्षपूर्ती ची आणि पुढील काळा...

तोकड्या तलवारीची लढाई

 *तोकड्या तलवारीची लढाई* हे रोखठोक वाचले. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती चे अभिनंदन. हे वर्ष अनेक अस्मानी संकटांना लढा देत  तसेच विरोधकांच्या सरकार पाडण्याच्या नाट्याचे अनेक प्रयोग होत असताना ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमी, नीतीपूर्ण आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याच्या संस्कारांनी आपली यशस्वी घोडदळ करत आहे. कथेतील सेनापतीने सांगितल्याप्रमाणे उद्धव साहेबांनी विश्वासाचे आणि संयमाचे एक पाऊल पुढे टाकून घ्या तोकड्या तलवारीने रणांगण जिंकून घेतले आहे. पहाटेच्या साखरझोपेत झालेला शपथविधी आणि सरकार पाडण्याची दिवास्वप्न पाहणारा विरोधक यांनी आतातरी जागे होऊन आपली विरोधी पक्षाची भूमिका महाराष्ट्राच्या  राजकारणाला शोभेल अशा पद्धतीने पार पाडली पाहिजे. सरकार किती जणांचे आहे यापेक्षाही महत्त्वाचे ते किती विश्वासानी जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे.

स्वातंत्र्याची ऐसी तैसी

 *स्वातंत्र्याची ऐसी तैसी* *स्वातंत्र्या तुझी व्याख्या काय?* हे 'रोखठोक' वाचताना जे भारतीय संविधान न्याय, स्वातंत्र्य आणि समता या भक्कम पायावर उभे राहिले आहे त्याचीच केंद्रीय सत्तेकडून पायमल्ली होत असल्याचे दिसून येते.     सत्तेचा उपभोग हा केवळ वैयक्तिक हितासाठी घेण्याची वृत्ती बळावताना दिसत आहे. भाट आणि हुजरेगिरी करणाऱ्यांनाच सत्तेची मलई चाखायला मिळण्याची हल्लीची काही प्रकरणे पाहिली असता याच साठी का सामान्य जनतेने कमळ फुलवले हा प्रश्न पडतो?    नैराश्य आणि कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या करणारा नट, आपल्या बेताल बोलण्याने मुख्यमंत्र्यांना अरे तुरे  आणि शेतकरी आंदोलकांना भाडोत्री म्हणणारी नटी, लोकशाहीचा चौथ्या स्तंभाचा आक्रस्ताळी पत्रकार, अमली पदार्थांचा साठा करणारी विनोदी नटी यांच्यासाठीच केवळ केंद्रीय सत्ता, सर्वोच्च न्यायालय आहे का? दिल्लीच्या सीमेवर थंडीमध्ये न्याय्य हक्कांसाठी लढणारा शेतकरी हा या न्यायव्यवस्थेचा आणि सत्तेचा कोणीच नाही का यासारखे प्रश्न उभे राहतात.      स्वैराचार, स्वार्थ, सामाजिक अहित यांना कायदेशीर बंधने घालून स्वातंत्र्याचा ...